
मनाली आणि लाहोल व स्पिटी जिल्ह्य़ाचे मुख्यालय असलेल्या केईलाँग दरम्यानचे अंतर या बोगद्यामुळे ५५ किलोमीटरने कमी होऊन प्रवासाचा कालावधीही चार तासांनी कमी होणार आहे, असे धुमल यांनी सांगितले.
हिवाळ्यातील जोरदार हिमवृष्टीमुळे रोहतांग, कुन्झाम आणि बारा लापचा ला या हिमालयातील खिंडी बंद होतात. त्यामुळे लाहोल व स्पिटी, पंगी आणि किल्लर या भागाचा जवळजवळ ५ ते ६ महिने जगाशी संपर्क तुटलेला असतो. त्यामुळे नव्या बोगद्यामुळे या अतिशय दुर्गम भागातील अर्थव्यवस्थेला आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे.
धुमल यांनी सांगितले की, हिंदुस्थान तिबेट आणि दार्चा-शिंकोला या मार्गावर अशाच प्रकारचे दोन बोगदे तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रदेशाचा संपूर्ण देशाशी वर्षभर संपर्क सुरू राहील. या मार्गामुळे लडाख भागाला अत्यावश्यक बाबींचा पुरवठा करण्यासाठी एक अतिरिक्त मार्ग उपलब्ध होणार आहे.
साभार लोकसत्ता
No comments:
Post a Comment