लवकरच आपल्या भीटीला येत आहे ग्रंथाली प्रकाशनाचं नवं पुस्तक
‘हे प्रवासी गीत माझे.... आत्माराम परब
यांचा रंजक प्रवास’
हे श्री. आत्माराम परब यांच्या अखंड प्रवास यात्रेचे
श्री. नरेंद्र प्रभू यांनी शब्दबद्ध केलेले वर्णन
वाचताना प्रभूंनीच उदधृत केलेल्या ओळी आठवतात....
कितीक
चढते घाट पाहिले
अनेक
वळत्या वाटा
हरेक
वळणावरती वाटे
पुढे काय रे आता
पुढे काय....? पुढे काय....? पुढे काय....? अशी तीव्र उत्कंठा वाचकाच्या मनात निर्माण करून त्याला पानांमागून पानांचा
फडशा पाडायला प्रवृत्त करणारं हे पुस्तक आहे ! पुस्तकाचं हस्तलिखित मला मिळालं आणि
वाचताना मी अक्षरश: तल्लीन झाले. खरंच हे पुस्तक वाचताना वाचक रममाण होतील अशी
माझी खात्री आहे.
जेष्ठ
समाजसेविका आणि लेखिका
रेणू गावस्कर