Sunday, March 22, 2015

'आत्मा'कथन



मित्र हो...! म्हणता म्हणता एक तप पुर्ण झालं. बारा वर्षापुर्वी आजच्याच दिवशी ‘ईशा टुर्स ’ची
सुरुवात झाली आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा प्रवास खरंच अविस्मरणीय असा झाला. लडाखपासून सूरू केलेला हा प्रवास अनेक दिशांनी, अनेक मार्गांवर होत राहिला आणि ईशा टुर्स चे पर्यटक विदेशातील सहलींनाही जावू लागले.

बारा वर्षांपूर्वी लावलेला एक वेलू आता गगनावर जायला सज्ज झाला तो केवळ आपल्यासारख्या जिव्हाळ्याच्या पर्यटकांमुळेच. विस्तार भयास्तव नाव घेत नाही. पण आज मागे वळून बघताना दिसतात ते तुमचे सर्वांचे आशिर्वादाचे हात, सतत दिलेलं प्रोत्साहन आणि अगदी प्रत्येक पायरीवर दिलेला मदतीचा देकार.

पर्यटक मित्रांना फिरवायचं तर ते मळलेल्या वाटांवरून नाही तर लडाखसारख्या अनोख्या प्रदेशात,  स्कॅन्डेनेव्हीया सारख्या धृवप्रदेशात, अंदमान सारख्या सागरी व्दिपावर, पुर्वांचलासारख्या हिमालयीन रांगावर किंवा कैलास सारख्या शिखरांवर. जाणूनबुजून या वेगळ्या वाटा आम्ही धुंडाळल्या त्या तुम्ही वेळोवेळी दिलेल्या सहकार्यामुळेच. प्रत्येक सहलीनंतर जसजशी आपली कौतूकाची आश्वासक थाप पाठीवर पडत गेली तसतसा आमचा उत्साह वाढत गेला आणि आता अगदी कुठेही गेलात तरी आम्ही तुमच्याबरोबर येणार म्हणणारे आपल्यासारखे पर्यटक हाच आमचा ऑक्सिजन होवून बसला आहे.
आपल्या सर्वांच्या सहवासात एक तप पुर्ण होत आहे आणि पुढच्या सहप्रवासाठी ‘ईशा टुर्स ’ सज्ज होत आहे. नेमक्या या वळणावर मनात असंख्य आठवणी दाटून येत आहेत. या आठवणींनीच आम्हाला समृद्ध केलं आहे. या प्रवासादरम्यान आम्ही कमावलं ते आपलं प्रेम आणि विश्वास. हे सर्व असचं कायम असू द्या. नवनवीन मार्गांवरच्या सहली तर आपण करीत राहूच पण पर्यटनाच्या वाटेवरची ही साखळी वृदींगत होताना आपला सर्वांचा त्यात सहभाग असेल, नाही असणारच अशी खात्री बाळगतो.

आपले नम्र

‘टीम ईशा’
आणि
आत्माराम परब

२२ मार्च २०१५ 

LinkWithin

Related Posts with Thumbnails