Friday, October 17, 2014

सहलीला जाताना...


दक्षता दिवाळी अंकात आत्मारम परब यांचा लेख प्रसिद्ध झाला.


सहलीचा नुसता विचार जरी मनात आला तरी आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लीत होतात. रोजच्या जीवनातलं साचलेपण दूर करण्यासाठी, पुन्हा एकदा नव्याने सुरूवात करण्याआधी ताजंतवानं होण्यासाठी आपण सहलीला जातो. सहलीला कुठे जायचं?  कुणासोबत जायचं? काय बघायचं?  अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरूवात होते. सहलीची मज्जा नेमकी इथेच सुरू होते. सहलीचं ठिकाण जेवढं लवकर नक्की करता येईल तेवढं ते केल्याने ती सहल अधिक सुखकारक होते. आपल्या खंडप्राय देशात हजारो पर्यटन स्थळं विकसीत झाली आहेत, फक्त भारत देश संपुर्ण फिरायचा असं ठरवलं तरी शेवटी काहीतरी शिल्लक राहीलच अशी त्याची व्याप्ती आहे, बाकी जग फिरायच ठरवलं तर पहायलाच हवीत अशी कितीतरी ठिकाणं डोळ्यासमोर येतात.


आत्माराम परब     
संचालक ईशा टूर्स
9892182655






LinkWithin

Related Posts with Thumbnails